
This episode explores the management and cultural significance of the Ashadhi Wari pilgrimage to Pandharpur, featuring insights from Dr. Rupali Shinde.
आषाढी वारीच्या मुहूर्तावर लाखो पावलं पुन्हा पंढरीच्या वाटेला लागली आहेत. असंख्य वारकरी, ७०० वर्षांची अखंड परंपरा — आणि आजवर एकही चेंगराचेंगरीची घटना नाही. कोणतीही केंद्रीय यंत्रणा नसताना हे घडतं तरी कसं? पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे — ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. "जिथं वारकरी, तिथपर्यंत महाराष्ट्र" असं रंगनाथ पठारे का म्हणतात? पालखीची परंपरा तुकोबांनी नव्हे, तर त्यांच्या पुत्रांनी सुरू केली हे किती जणांना ठाऊक आहे? ज्ञानोबा-तुकोबांच्याही आधीपासून वारी चालत आली आहे, नामदेवांचे तब्बल ४० अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबात विराजमान आहेत — आणि जगाला व्यवस्थापनाचे धडे देणारे मुंबईचे डबेवाले मुळात वारकरीच आहेत! या वारी विशेष भागात संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. रूपाली शिंदे वारीचं अंतरंग उलगडले आहे — ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेला तत्त्वज्ञानाचा पाया, नामदेवांनी उभी केलेली कीर्तन-अभंगांची प्रसारयंत्रणा, विठ्ठल म्हणजे नेमका कोण या वादाचं अभ्यासपूर्ण उत्तर, आणि हैबतबाबा आरफळकरांनी वारीला लावलेली अशी शिस्त, जी आजही जशीच्या तशी चालते आहे.
Host: Dwitiya Sonawane
Guest: डॉ रूपाली शिंदे
Organizations: गुरु ग्रंथ साहिब
Places: पंढरपूर
Explore listener stats, chart rankings, contacts and more on the ग्रंथप्रेमी - Granthpremi podcast page.